. ●┈┉┅━❀꧁ॐ꧂❀━┅┉┈●
-:♦ कपाळी गंध कशासाठी लावायचे ? :------------
-:♦ ते नेमके कुठे लावावे ? :------------
●┈┉┅━❀꧁ॐ꧂❀━┅┉┈●
|| कपाळावर गंध लावण्याची पद्धत हळू-हळू कमी होत
|| चालली आहे. गंध लावून बाहेर जाण्यास आजच्या काळी
|| कमी पणा वाटतो. वास्तविक कपाळी गंध लावण्याचे
|| अनेक फायदे आहेत. त्याच प्रमाणे गंधाद्वारे बुद्धीचे
|| आश्रयस्थान असलेल्या मस्तकाची पूजा करण्याचाही हेतू
|| आहे म्हणूनच ईशपूजनानंतर पूजकाने आपल्या कपाळी
|| गंध लावण्याची प्रथा पडली. गंध म्हणजे केवळ कपाळाची
|| शोभा नव्हे, तर बुद्धीचेही पूजन आहे. ईश्वर हे साध्य,
|| तर बुद्धी हे साधन असल्याने बुद्धीची पूजा करणे
|| आवश्यकच आहे.
|| गंध हे मांगल्याचेही प्रतीक आहे. कपाळी गंध लावलेला
|| माणूस आणि गंध न लावलेला माणूस यातला फरक
|| लगेच लक्षात येतो. गंधामुळे माणूस शुचिर्भूत बनतो.
|| त्याचा चेहऱ्यावर मांगल्याचे भाव दिसू लागतात.
|| आकाशाने देखील यासाठीच सूर्य-चंद्ररूपी दोन तिलक
|| दिवसा व रात्री धारण केले आहे. मात्र हे गंध दोन्ही
|| भुवयांच्या मध्ये { आज्ञाचक्रात } कधीही लावू नये. ते त्या
|| वरील भागात लावावे. कारण आज्ञाचक्राच्या ठिकाणी
|| असलेला सुप्तावस्थेतील तृतीय नेत्र बंद होता कामा नये.
|| नित्य गंध लावणारा मरणोत्तर वैकुंठलोकी जातो असे
|| धर्मशास्त्र सांगतात.गंध लावण्याचा अधिकार प्रत्येक
|| वर्णातील पुरुषाला आहे; श्रीकृष्णाचे उपासक उभे गंध
|| लावतात, तर शिव उपासक आडवे गंध लावतात. गंध
|| चंदनाचे, केशराचे, रक्तचंदनाचे व गोपीचंदनाचे जसे
|| आवडेल तसे लावावे. बाहेर जाताना गंध लावून जाण्याची
|| लाज वाटत असेल, तर निदान देवपुजेनंतर तरी कपाळी
|| गंध आवर्जून लावावे.
-:♦ स्नान झाल्यावर कपाळावर टिळा, गंध का लावतात ?
|| आपला देह म्हणजे ईश्वराचे मंदीर आहे. मंदिरात जो सर्वत्र
|| ईश्वरी भाव असतो तसाच देहात रोमारोमात होणारे स्फुरण
|| हे ईश्वरी भावाकडे खेचणारे असते. हे ईश्वरी तत्व विशेष
|| करून मर्म स्थानात प्रतीतीस येते. भ्रुकुटीचे मध्यभागी
|| आज्ञाचक्रावर सगुण परमेश्वर वास करतो. देहाला मायेची
|| उपाधी असेपर्यंत सगुण परमेश्वराचीच पूजा करणे प्रशस्त
|| असते.
|| म्हणून स्नान झाल्यावर कपाळाचे मध्यभागी असणाऱ्या
|| परमेश्वराच्या मूर्तीस टिळा लावावा. म्हणजे ही सुद्धा एक
|| छोटी देवपूजा असते. ज्यांना कामाचा भरपुर व्याप असून
|| श्वास घ्यायला देखील फुरसत मिळत नाही अशा माणसांनी
|| स्नान झाल्यावर किमान कपाळी टिळा तरी लावावा.
|| त्या निमित्ताने भगवंताची पूजा होते.
|| टिळा लावताना मधल्या बोटाने लावावा, मधल्या बोटाचा
|| संबंध हृदयाशी असल्यामुळे या बोटातून प्रवाहित होणारी
|| स्पंदने हृदयापर्यंत जाऊन भिडतात. जप करताना सुद्धा
|| मधले बोट वापरतात. त्यामुळे दिवसभर मन शांत व
|| भक्तिभावाने राहते. टिळा लावल्यामुळे मनुष्य सहसा पाप
|| कर्माकडे वळत नाही. कारण जो टिळा लावतो तो देवाला
|| मानतो.
|| समाज देखील त्याच्याकडे सन्मानाने बघत असतो. हिंदू
|| धर्माखेरीज इतर कोणत्याही धर्माचे लोक टिळा लावत
|| नाहीत. या बाबतीत कठोप निषदात असे सांगितले आहे.
|| की हृदयातून निघणाऱ्या शंभर प्रमुख नाड्यांपैकी सुषुम्ना
|| ही नाडी मस्तकाच्या समोरील भागातून निघते. यातूनच
|| मोक्ष मार्ग निघत़ो जो ऊर्ध्व दिशेने जातो. माणसाचा मृत्यू
|| झाल्यावर जीवात्मा या मार्गाने गमन करता झाला तर
|| त्याला त्वरित गती मिळते. म्हणूनच कपाळी तिलक धारण
|| करतात.
-:♦ चंदनाच्या टिळ्याला महत्त्व आहे :------------
|| कारण नाकातून वाहणाऱ्या दोन नाड्यांपैकी एक धन व
|| दुसरी ऋण असते.धन नाडीतून श्वास वाहताना निर्माण
|| होणारी उष्णता रोखण्या साठी चंदन तिलक महत्वाची
|| कामगिरी बजावतो. कपाळावर टिळा लावताना औषधी
|| चंदन, हळद, अष्टगंध, गुलाल, कृष्ण चंदन, बुक्का
|| इत्यादीचा शुद्ध टिळा लावावा.
-:♦ टिळा लावणे :------------
|| टिळा लावल्याने समाजामध्ये मान-सन्मानाने पाहतात.
|| आर्य धर्मात प्रत्येक शुभ कार्यात टिळा लावणे ही प्रथा
|| आहे. टिळा अनेक वस्तू आणि पदार्थाचे असतो.
उदा. हळदी, कुंकू, केशर, भस्म आणि चंदन हे प्रमुख आहे.
-:♦ पण टिळा लावण्या मागे काय भावना असते ? :-------
|| पुराणामध्ये असे लिहिलेले आहे की, संगमाच्या
|| किनाऱ्यावर "गंगा स्नान" केल्या नंतर साधू / पंडिताद्वारे
|| टिळा लावल्यास मोक्ष प्राप्ती होते. कपाळावर टिळा
|| लावण्यामागे आध्यात्मिक महत्व आहे. आपल्या शरीरात
|| सात { ७ } सुक्ष्मउर्जा केंद्र आहे जे अपार शक्तीचे भांडार
|| आहे. त्यांना "चक्र" असे म्हणतात.
|| कपाळाच्यामध्ये जिथे आपण टिळा लावतो, तिथे आज्ञा
|| चक्र असते. हा चक्र आपल्या शरीराचा सगळ्यात
|| महत्वपूर्ण स्थान आहे.
-:♦ इथे आपल्या शरीराच्या प्रमुख तीन नाड्या :------------
१ } इडा, २ } पिंगला आणि ३ } सुष्मना
|| येऊन मिळतात म्हणून याला "त्रिवेणी" किवा "संगम" पण
|| म्हणतात. हे गुरु स्थान आहे. इथूनच पूर्ण शरीराचे संचालन
|| होते. हे आपल्या चेतनांचे मुख्य स्थान पण आहे. याला
|| मनाचे घर पण म्हणतात. यामुळे हे स्थान पूर्ण शरीरात
|| सगळ्यात जास्त पूजनीय आहे. योगामध्ये ध्यान करता
|| वेळी याच ठिकाणी मन एकाग्र केले जाते. टिळा
|| लावल्याने स्वभावात चांगले बदल घडून येतात व
|| पाहणाऱ्याचे सात्विक प्रभाव आपल्यावर पडतो.
-:♦ टिळा काही खास प्रयोजनासाठी पण लावतात :-----
१ } जसे मोक्षप्राप्ती करायची असेल तर टिळा अंगठ्याने..
२ } शत्रूचा नाश करायचा असेल तर तर्जनीने,
३ } धनप्राप्ती हेतू मध्यमानी आणि
४ } शांती प्राप्ती साठी अनामिकानि टिळा लावला जातो.
|| साधारणत : टिळा अनामिकेद्वारे लावला जातो आणि
|| त्याच्यात पण चंदनाचे लावला जातो.
|| तिळ्यासह तांदूळ लावल्यास आई लक्ष्मी आकर्षित होते व
|| थंडक व सात्विकता प्रदान करण्याचा निमित्त लपलेले
|| असते. म्हणून टिळा जरूर लावावा. आर्य प्रथेप्रमाणे टिळा
|| न लावणे अशुभ आहे. टिळा आर्य संस्कृती ची ओळख आहे
|| टिळा लावणे हे फक्त धार्मिक नव्हे तर वैज्ञानिक कारण
|| कपाळावर टिळा लावण्याच महत्व : हिंदू धर्मात पूजा
|| करताना टिळा लावण्याची प्रथा आहे. पूजाच कशाला
|| इतर मंगल कार्याची सुरूवातही गंध लावूनच करण्यात
|| येते. गंध लावल्याशिवाय कोणतेही मंगल कार्य सुरू होत
|| नाही.
|| कपाळावर टिळा नसणे हे अशुभ मानले जाते. पूजेच्या
|| वेळी कुंकुम टिळा किंवा चंदनाचा टिळा लावतात.
|| हा टिळा कपाळा वर किंवा दोन्ही भुवयांच्या मधोमध
|| लावण्याची प्रथा आहे. अनामिकेच्या खालचा भाग हस्त
|| ज्योतिषानुसार सूर्यक्षेत्र मानले गेले आहे.
|| कपाळावर आज्ञा चक्राचे स्थान आहे. सूर्याच्या बोटाने
|| टिळा लावल्याने मुखमंडल सूर्याप्रमाणे तेजस्वी बनू लागते.
|| तसेच आज्ञाचक्रही जागृत व्हायला मदत होते. यामुळे
|| मनाची एकाग्रता वाढायला मदत होते. टिळा लावणारा
|| यशस्वी आणि ओजस्वी बनतो.
-:♦ कपाळावर चंदनाचा टिळा लावण्याचे आरोग्यदायी :---
-:♦ महत्त्व कपाळावर का लावतात चंदनाचा टिळा ? :---
-:♦ पूजा :------------
|| विधींमध्ये कपाळावर टिळा लावण्याची प्रथा आहे.
|| भारतात नियमित देवपूजेमध्ये देखील चंदनाचा वापर
|| केला जातो. परंतू आपल्या प्राचीन संस्कृतींना देखील
|| विज्ञानाचा आधार आहे. मग जाणून घ्या चंदनाच्या टिळा
|| लावण्यामागील आरोग्य दायी कारण.
-:♦ वैज्ञानिक आधार :------------
|| कपाळावर दोन भुवयां मध्ये ‘अग्न’ चक्राचे स्थान असते.
|| या स्थानालाच ‘तिसरा डोळा’ म्हणतात. हे एक उर्जा स्थान
|| असल्याने अध्यात्मात या स्थानाला विशेष महत्त्व आहे.
|| म्हणूनच कपाळावर चंदनाचा टिळा लावण्याची प्रथा
|| आरोग्यदायीदेखील ठरते.
-:♦ चंदनाच्या टिळ्याचे ३ फायदे :------------
१ } एकाग्रता सुधारते ♦:------------
|| आध्यात्मिक गुरू श्री श्री रवी शंकर यांच्या मते, तिसरा
|| डोळा हा शरीरात एकाग्रता वाढवण्याचे केंद्रस्थान आहे.
|| चंदनाचा टिळा कपाळावर लावल्यास मन स्थिर होण्यास
|| आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. थंड प्रवृत्त्तीचे
|| चंदन शरीरात आणि कालांतराने मनाला शांतता
|| मिळवण्यास मदत करते.
२ } डोकेदुखीपासून आराम मिळतो ♦:------------
|| चायनिज अॅक्युप्रेशरनुसार दोन्ही भुवयां मधील जागा ही
|| शरीरातील नसा एकत्र मिळण्याची जागा समजली जाते.
|| त्यामुळे या ठिकाणी मसाज केल्यास डोकेदुखी पासून
|| आराम मिळण्यास मदत होते. तसेच या ठिकाणी चंदनाचा
|| टिळा लावल्यास नसांमध्ये थंडावा निर्माण झाल्याने
|| डोकेदुखीच्या त्रासापासून त्वरीत आराम मिळण्यास मदत
|| होते.
३ } सकारात्मक बनवते ♦:------------
|| तिसर्या डोळ्याचे स्थान हे अंतर्मन आणि विचारांचे
|| केंद्रस्थान आहे. नकारात्मक विचारातून शरीरात येणारी
|| नकारात्मक भावना या चक्राच्या माध्यमातून आत येते.
|| मात्र चंदनाच्या टिळ्यामुळे त्यांना रोखण्यात यश येते.
४ } निद्रानाश आणि ताण-तणावापासून आराम ♦:---------
|| अतिथकवा, मानसिक ताण किंवा अतिउत्साही
|| मनामुळेदेखील निद्रानाश होण्याची शक्यता असते.
|| आयुर्वेदानुसार कपाळावरील या स्थानावर चंदनाने मसाज
|| केल्यास ताण कमी होण्यास तसेच निद्रानाशाच्या
|| समस्येवर मात करण्यास मदत होते.
५ } शरीरात थंडावा निर्माण होतो ♦:------------
|| चंदना मध्ये मंद सुवासाप्रमाणेच शरीरात थंडावा निर्माण
|| करण्याची क्षमतादेखील आहे. यामुळे त्वचेच्या समस्या
|| दूर होतात. सोबतीलाच नसांना देखील थंडावा मिळतो.
|| भारतासारख्या उष्णकटीबंधीय क्षेत्रात कपाळावर चंदन
|| लावणे तुमच्या साऱ्या शरीराला थंड करण्यास मदत करते.
|| जयहरी विठल रामकृष्ण हरी ज्ञानोबामाउली तुकाराम ||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा